नुकताच "धुडगुस" पिक्चर पाहिला...टाईमपास होता, पण तिच्यावर बेतलेला प्रसंग नक्कीच जीवघेणा होता..ज्यांना अश्या प्रसंगाना तोंड द्यावे लागते,त्याची अवस्था कशी होत असेल ना??देव करो नि असे दु:ख कुणाच्याही वाटयाला न येवो...
दारामागे होणारी तिची
ती घालमेल
त्याला डोळयांत साठवताना
होणारी धडपड
तिची ही अवस्था समजत असेल का त्याला?
उंबरठयावरचे माप ओलांडुन
कालच ती घरात आली
अन् आज तो निघाला
दुरदेशी प्रवासासाठी
तिच्या मनातली व्यथा उमजत असेल का त्याला?
सगळयांच्या गोंधळात नीटसा
निरोप ही देता आला नाही
"परत कधी येणार?’ हा
प्रश्न कंठातच विचारलाच नाही
तिची ही अस्वस्था जाणवत असेल का त्याला?
त्याच्या ही मनात
असेल का हे सारे
वळुन तिला पाहण्याचा
मोह कसा तो आवरे
स्व:ताच्या मनाला समजावणं जमत असेल का त्याला???
मंगळवार, १७ मार्च, २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा