बुधवार, २५ फेब्रुवारी, २००९

मीलन

वैशाख वणवा मी मी म्हणतं होता
धरित्रीच्या अंगाची काहिली वाढवतं होता
पशु-पक्षी झाडे,पाने सारेच होते त्रस्त
वरुणाराजाची करुणा भाकण्यात व्यस्त

आणि एक दिवस अचानक
वारा सगळ्यांना सांगत सुटला
सूर्य ही आडुन आडुन पाहु लागला
आसुसली धरती, न कण-कण मोहरला

ढगांच्या काळ्या रथात बसुन
विजेच्या रोषणाई, मेघांच्या वाजंत्रीसहित
आगमला वरुणराज,बरसला तो
सुखावली धरितीची गात्रं न गात्रं

पसरला सुगंध आसमंतात
ल्यायली ती एक नवा साज
सुखावले सारे , गेले विसावुनी
अंकुरले बीज तिच्या कुशीतुनी...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: