मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०

What i gained and what i missed

मी ब्लोग वर लिहुन खुप दिवस झाले.उशीर झाल्याने आता थोडक्यात update देते.

अमेरिकेत गेल्यावर माझी गट्टी जमली ती maayboli.com शी. मायबोली म्हणजे मला जणु खजिनाच मिळाला. सुरवातीला तर मला वेड च लागले होते, उठता-बसता, झोपता मायबोली चेक करायचे.मग घरी बसुन काही करता येईल का किंवा या देशात येऊन काही नवे शिकता येईल का याचा शोध मी चालु केला. तेव्हा मला हे article वाचायला मिळालं अन माझं जगणं च बदलुन गेलं.

त्या लेखात सांगितल्या प्रमाणे मला काय करता येईल याचा मी विचार केला. दिड वर्षाचा मुलगा असल्याने मला बाहेर जाऊन काही करता येणार नव्हते किंवा थोड अशक्यच होते पण घरात मिळणारा वेळ, उपलब्ध असणारं फ़ास्ट इंटरनेट वापरुन बरेच काही जमणार होत.

मी हि मग आर्कुट वर Indian homemakers in USA नि H4 Marathi mandal ह्या community join केले.माझ्या शहरात Louisville मध्ये कोणी मराठी आहे का पाहिले. त्यातुन ओळख ही झाली. पण खुप पुढे नाही गेली. नंतर मग ति भारतात पुन्हा परत आली मग राहिलं.तश्या २ families ची सोबत होती आम्हांला. Indian homemakers in USA मधुन ही खुप शिकायला मिळालं.

Google नि maayboli वर सर्च करुन तिथला Accent शिकु लागले.लर्निंग लायसन्स काढण्यासाठी ड्राईव्हिंग ची परीक्षा दिली नि नवरयाकडुन ड्राईव्हिंग शिकु लागले. कारण ड्राईव्हिंग येत नसेल तर तिथे मनुष्य किती पांगळा होतो हे अनुभवले होते.

Hobby class ची चौकशी केली . एकदा तर michaels मध्ये जाऊन तिथला क्लास ही केला मी. मग मार्च मध्ये Indian homemakers in USA ह्या community वर वेगवेगळे online classes चालु झाले. त्यामुळे नेटवर्क वाढले, ओळखी झाल्या. त्या क्लासमधुन च मी वेगवेगळी म्हणजे गणपती, शंकर, महालक्ष्मी ,हनुमान चालिसा अशी काही स्तोत्र शिकले. crochet च्या क्लासमधुन मी बेसिक स शिकले नि माझ्या ते मनातच बसले. माझ्या हात्ताला काहीतरी काम मिळालं . मी माझ्या मुलांसाठी blankets, ducky, puppy, bunny, वगैरे नि purse असे बरेच बनवले. मी केलेले हे Creation पहा.

Google search करुन करुन kintting हि येउ लागले.I tried also cake makeing & decorating, cookies etc. लायब्ररीतुन बुक्स आणायचे, प्रिंटस काढुन आणायचे हा छंदच बनला. माझ्या मुला लाही लायब्ररी आवडायची, तिथले स्टोरी बुक्स नि ट्रेन ट्रेक.लायब्ररीतुन हिंदी फिल्म ही आणुन पाहिले आम्ही पुन्हा पुन्हा... !

These are the some site i came to know For crochet design /projects
http://www.michaels.com/

http://www.redheart.com/
http://www.caron.com/
http://www.lionbrand.com/

Indian homemakers in USA मधुन च फिट राहायचे धडे मिळाले. नि त्याचा उपयोग खरच खुप छान झाला.
आपण जेव्हा असे नोकरी निमित्त परक्या देशात जातो तेव्हा आपलं अजुन एक ध्येय असते savings. फिरणे, मजा करणे, खाणे-पिणे हे ही करतो पण savings बद्दल ही विचार करतो. मग मी Grocessary bill कमी कसे करता येइल हे बघितले नि यातुन शोध लागला तो coupons, चा. Indian homemakers in USA मध्ये हि Indian homemakers in USA असा एक थ्रेड आहे. google वर याच्या भरमसाठ sites आहेत. त्यातुन आपल्याला printables coupons मिळतात , ते स्टोअर मध्ये वापरुन u can save on your grocessary bill. प्रत्येक स्टोअर ची Weekely Add बघुन shopping करायची नि प्लस हि coupons वापरायची मग काय double savings. तशी मजा खुपदा आम्ही लुटायचो... तसेच prime outlet, premium outlet चि भटकंती,shopping... i really miss that...I am giving here some site which you can use for grocery , shopping when u are in USA.


ह्या ट्रिप मध्ये आम्ही नायगरा बघितला....अहाहा , त्याचे वर्णन शब्दांत कसे मावणार. आतापर्यत आपण भूगोलात वाचलेला, बघितलेला तो जगप्रसिध्द धबधबा. वाटलं डोळ्यांचं पारण फिटलं. तो प्रचंड पाण्याचा झोत, त्याचा तो कोसळणारा आवाज, नि संध्याकाळच्या लाईट मधले त्याचे ते मनाला भुलवणारे विलोभनीय दृश्य. सगळचं अप्रतिम...!!! जवळच असलेल्या Kings Island ह्या theame park ला भेट दिली. तिथले rides मध्ये खुप मज्जा आली. मुलासाठी पुन्हा एकदा आम्ही Disney land, universal studios पाहिले. Magic kingdom, Animal kingdom मध्ये मुलाबरोबर लहान होऊन मजा केली.

मला Friendship international चा उशीराच शोध लागला.september मध्ये त्याची first semester चालु होत असते. त्या तिथे वेगवेगळे Hobby class Weekely घेतले जातात. त्यासाठी काही फि नसते व transport हि church provided असते. मला आवडले त्यांचे क्लासेस. आणि मराठी मैत्रिणी हि मिळाल्या खुप सारया.मी तिथे Pottery class मध्ये Dish and name plate बनवले. एक वस्तु बनवायला जवळजवळ १ महिना लागतो . कारण एका आठवडयात वस्तु बनवायची. मग दुसरया आठवडयात तिला थोडा finishing touch देऊन oven मध्ये burn करायला दयायचे. Next week मध्ये paint करायचे नि पुन्हा oven मध्ये burn करायचे. fourth week मध्ये मग ति वस्तु तयार होते.आम्ही Oct end la (31st Oct 2009) ला परत यायला निघणार होतो त्यामुळे मी तेवढेच करु शकले. नि badluck , येताना मी केलेली डिश फुटली, व्यवस्थित pack करुन ही.

हे सगळं मला शक्य झालं ते माझ्या husband मुळे. त्याच्या मुळे च मी अमेरिकेत जाऊ शकले, फिरु शकले. खुप छान होते ते दिवस. ते आठवण ही मनाला सुखावते. मला आमचे ते घर, कॊलनी, गार्डन( जिथे माझा मुलगा रमायचा) ,लॊन्ड्री, ते कार मधुन भटकणे,झालेल्या ओळखी, पाहिलेली ठिकाणे, तिथे पाहिलेले christmas,Halloween,thanksgiving, Thuder of Louisville,enjoy केलेला black friday सगळं सगळं खुप आठवते.तिथे असताना हि इथल्या प्रत्येक गोष्टीला गमावलो.पण तरी हि Misssssssssssss u .............
Misssssssssssss u USA Days.............


मंगळवार, १३ ऑक्टोबर, २००९

जरा विसावु या वळणावर...


आम्हांला अमेरिकेत येऊन सप्टेंबर मध्ये एक वर्ष झालं...दिवस बघता बघता निघुन गेले....मागे बघुन वळायचं म्हटलं कि वाटतं किती हा मोठा काळ...काय केलो आपण गेले वर्षभर....?

एकदा ३ महिन्यांसाठी अमेरिकेचं धावत दर्शन घेऊन गेल्यानंतर मला वाटतं होते , पुन्हा जाऊ का आपण यु.स. ला?? अन् ती माझी इच्छा पुर्ण झाली.माझ्या स्वभावाप्रमाणे मी खुप काही उलाढाली , खटाटोपी केल्या इकडे आल्यावर...वेळ जावा म्हणुन, वेळ सत्कारणी लागावा म्हणुन...त्यातुन च नवीन गोष्टी शिकत गेले, खुप काही मिळाले. पण त्या बरोबरच घरच्यांना मिस केले ......ते तर आहेच...:(

पण ह्या गोष्टीतुन मिळणारा आनंद घेऊन मी परतणार आहे. अन् तो परत परत मिळवणार आहे....

मी इथे आल्यापासुन काय काय केले, शिकले हे मला खुप दिवसां पासुन लिहायचं होते. कारण मला वाटत कि त्याचा उपयोग नक्कीच कुणाला तरी होईल. घरापासुन दुर आहे म्हणुन दु:ख , वाईट वाटतं बसण्यापेक्षा हेच दिवस अविस्मरणीय, आनंदी करण्याचा काही ना काही मार्ग सापडेल.....!!!

ह्या फोल्डर मधल्या पोस्ट मध्ये माझे इथले अनुभव मी लिहीले आहेत...त्याचा तुम्हांला उपयोग झाला तर मला आनंदच होईल....

सोमवार, २४ ऑगस्ट, २००९

गणपती बाप्पा मोरया...


गणपती उत्सवाच्या सगळयांना शुभेच्छा !!!!

गणपती बाप्पा मोरया......मंगलमुर्ती मोरया.......

गुरुवार, १६ जुलै, २००९

कणा



शाळेत असताना ९ वी ला कुसुमाग्रजाची ही कविता होती आम्हांला,"कणा".....मला खुप आवडली होती , अजुन ही आवडते...किती सोपी, छान पण खुप अर्थ असलेली....एखाद्या पुरग्रस्ताचे किती अचुक वर्णन केले आहे ह्यात...

त्याचा निर्धार, आत्मविश्वास वाखण्याणासारखा आहे....खुप काही शिकवुन जाते ही कविता...

कणा

"ओळखलांत का सर मला?" पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले नि केसावरती पाणी

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुन,
गंगामाई पाहुणी आली गेली घरटयात राहुन

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळया हाती जाईल कशी बायको मात्र वाचली

भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले

कारभारणील घेऊन संगे सर आता लढती आहे,
पडकी भिंत बांधतो आहे,चिखल-गाळ काढतो आहे

खिशाकडे हात जातच हसत हसत उठला,
पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला

मोडला असला संसार जरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवुन नुसते लढ म्हणा
पाठीवरती हात ठेवुन नुसते लढ म्हणा




बुधवार, ८ जुलै, २००९

Sorry for late

खुप दिवस झाले, काही लिहायला जमले नाही...लिहुन पोस्ट करायचं आहे म्हणता म्हणता १ महिना गेला..पण लवकरच पोस्ट करेन.....

Extremaly sorry for late

मंगळवार, २ जून, २००९

काही चारोळया


यु.स. मध्ये आल्यावर मी काय केले असेन तर पहिले मायबोलीवर साईन-इन केले...नंतर मग मायबोलीच मला लळाच लागला...हळुहळु मग तिथे लिहायला सुरुवात केली......
मायबोली वर खुप मातब्बर मंडळी आहेत...नी ऑर्कुटवर आमच्यासराखे नवोदित..त्यामुळे ऑर्कुटवर जास्त लिहिले गेले....एकमेकांना उत्तर चारोळी,कविता ह्या माध्यमांतुन दिली जाऊ लागली.त्यामुळे ह्या सगळयात माझे मन रमु लागले...दुर देशी वाटणारा एकाकीपणा गळुन पडला...

अश्याच ह्या न्‌ त्या कारणाने लिहिलेल्या काही चारोळया मी इथे एकत्र करत आहे....तुम्हांला आवडतील अशी आशा करते...

धन्यवाद....

~~~~~

तुला आठवायची मला
कधी गरज भासणार नाही
कारण तुला आठवायला
मी तुला विसरणारच नाही
~~~~~
काही क्षण असेच असतात
अळवावरच्या पाण्याच्या थेंबासारखे
मोत्यासारखे भासणारे पण
क्षणात विस्कटुन जाणारे

~~~~~
पण क्षण हरवले तरी
आपण सावरायचे असते
मोत्यांसारख्या क्षणांना
मनाच्या आठवणींत साठवायचे असते
~~~~~
आठवणींच्या हिंदोळयांवर
मन हे वेडे झुले
कधी जमिनीवर तर कधी नभात
माझे न मलाच ठावे
~~~~~
आठवणींच्या हिंदोळयांवर
पुन्हा नाही झुलायचे
वळुन ही न पाहता
थेट मागे फिरायचे
~~~~~
पण आज पुन्हा एकदा फसलो
ठरवुन ही पुन्हा वाहवत गेलो
आठवणींचे थेंब मोजत बसलो
कोरडा असुन हि मी पुरता भिजलो....
~~~~~

माझे हे मन सुध्दा कधीच
तुझं झालं होतं
तुझं-माझं, माझं-तुझं
न करता तुझ्यात गुतलं होतं

असेन हि मी तुझ्या लेखी वेडी
पण तुझं मन मला कळलं होतं
तुझी नसेन झाली मी, पण
म्हणुन माझं प्रेम दुबळं नव्हतं

तुझ्यावरचं प्रेम नक्कीच खरं होतं
पण आई-वडिलांची माया,त्याचं प्रेम
त्याचे उपकार कशी मी विसरु
शक्य नव्हते मला ते

मला कळतय़ं, तुला मी दुखावलयं
माझ्याच मुळे आज दु:खी आहेस तु
तु माफ करावसं असे नाही मी म्हणणार
पण एकदा मात्र जरुर बघ माझ्याजागी तु
~~~~~
तुझी-माझी मैत्री
अशीच फुलावी
नात्याच्या वेलीवर
अविरत झुलावी
~~~~~

कुठेतरी अचानक झालेल्या ओळखीचे
मैत्रीत रुपांतर होते
जणु काही कळीपासुन
अलगद फुल उमलते

मग त्याचा सुगंध
आसमंतात पसरतो
मित्र-मैत्रिणींना
सुखावुन जातो

अशीच मग मैत्री
बहरत जाते
विश्वाच्या खांद्यावर
अगदी घट्ट विसावते
~~~~~
ओठाने बोलण्याआधी
माझे मन चहाडी करते
म्हणुन तर तिच्या डोळ्यांत
माझे प्रेम तराळते

~~~~~
पैसा कि प्रेम?

प्रेम न्‌ पैसा
नाण्याच्या दोन बाजु
व्यवहारी या जगात पैशाशिवाय पान ही हलत नाही
पण म्हणुन प्रेमाचं आस्तित्व नाकारुन चालणार नाही
दोन्ही ही गोष्टी तराजुत तोलायच्या ठरवल्या
पण प्रेमाची बरोबरी काही पैशाला जमेना
~~~~~
तुझ्या सोबत जगायचयं
म्हणुन तर क्षण मोजतेय
तुझ्यासोबत मरायचयं
म्हणुन तर स्वत:ला जगवतेय
~~~~~
स्पर्श

तु जवळ आलास की
असचं काहीसं होतं
बोलायचं खुप असलं तरी
सगळं कसं गप्प होतं

शांत राहुन तुला
अनुभववासं वाटतं
तुझ्या प्रत्येक श्वासात
आयुष्य जगावसं वाटतं

शब्दांपेक्षा मला स्पर्श
जवळचे वाटतात
म्हणुन तुझ्याशी बोलताना
शब्द तोकडे पडतात

बोलणं नाही झालं तरी
परपस्परांचे मन कळते
न्‌ म्हणुन कि काय
शब्दांचे घुटमळणे
मला नको वाटते
~~~~~



शुक्रवार, ८ मे, २००९

आणि म्हणुन मला माझा अभिमान आहे !

आई, बहिण, सुन,लेक
प्रत्येक वळणावर एक नवं रुप
पण शेवटी ती एक स्त्रीच आहे
आणि म्हणुन मला माझा अभिमान आहे

पुरुषांच्या वर्चस्वाखाली नेहमीच ती दबली
प्रसंगी पडली,रडली,पण धडपडुन उभी राहिली
आज ही तिची ही झुंज चालुच आहे
कधी आपल्या तर कधी परक्या माणसांविरुध्द आहे
आणि म्हणुन मला माझा अभिमान आहे

तिनेच शिवबा घडवला, तीच होती श्यामची आई
तर कधी रणांगणावर समर्थपणे झुंजणारी लक्ष्मीबाई
अहिल्याबाई होळकर,ताराबाई असे तिचे अनेक दाखले
अंतराळात ही उमटवली तिने स्वत:ची पाऊले
आणि म्हणुन मला माझा अभिमान आहे

खुपदा अन्याय, अपमान तिने गिळला
पण घरकुलाचं घरपण तिनेच राखलं
होणारया अत्याचाराला तिने रोखलं
प्रसंगी स्वत:ला बळी ही दिलं
स्वत:चं स्त्रीत्व तिनं जपलं
आणि म्हणुन मला माझा अभिमान आहे

या जगांत नेहमीच ती दुय्यम ठरली
पण स्वत:च आस्तित्व तिने जगवलं
सुर्य नसेल ही ती कदाचित पण
काजवा मात्र नक्की आहे
अश्या हया स्त्रीचा मी ही एक अंश आहे
आणि म्हणुन मला माझा अभिमान आहे

शनिवार, २५ एप्रिल, २००९

हिरकणी

खुप दिवसांनी लिहित आहे, मध्ये लिहायला जमले नाही...म्हणजे टाईप करुन पोस्ट करायला वेळ मिळाला नाही...

हिरकणी


वेडीवाकडी वळणे घेत डोंगरावरुन उतरणारी पायवाट
आणि मातीत मिसळणारी ती गोरी पाऊले
वेडयासारखी ती पळत होती
पिल्लासाठी कोणी एक माऊली आसुसली होती

तिला स्वत:चाच राग आला
तिच्या गरीबेचा,असहायतिचेचा
पण काय करणार बापडी
परिस्थितीपुढे तीच हतबल झालेली

आठवली तिला कुणीतरी सांगितलेली हिरकणी
पण पोटाची खळगी भरण्यासाठी
ती रोजच डोंगर चढायची
एकदाच नाही तर ,रोज रोज हिरकणी व्हायची

अंधार ही आता चांगलाच तरुण झाला होता
सगळया जगाचा त्याने जणु ताबा घेतला होता
पण तिला कसलीच तमा नव्हती
ना खाच-खळगे,दगड-धोंडे ,काटे-कुटयां ची भीती

वेशीजवळ येताच पाहिलं
कुणी एक वासरु गाईला लुचलेलं
तिचं काळीज अधिकचं ओलावलं
भरल्या पान्हानं ती तशीच सुटली
अगदी पळतच......





सोमवार, ६ एप्रिल, २००९

गाठोडे

पसारा आवरता आवरता
फडताळात सापडले एक गाठोडे
मनात मात्र जुन्या
आठवणींचे काहुर उठले

जुने-पुराणे फाटके,विटलेले
तरी हि जपलेले
गाठोडे उघडताच
मन कधीच त्यात शिरले

हा बापडा शालु
अजुन ही तसाच तलम
नव्या नवरीच्या अंगावर
अगदी दृष्ट लागण्याइतका खुलला होता
चमकले ओठांवर, आठवणींचे हसु
अन्‌ क्षणात डोळयांत झाले त्याचे आसु

ही शालजोडी त्यांच्या आवडीची
असंख्य प्रेमळ आठवणींची,करारीपणाची
भ्रताराची आठवण काळजात रुतली
जुन्या आठवणींवरची खपली निघाली
शेजारी कसलातरी भास झाला
अन्‌ आपसुकच पदर सावरला गेला

शेजारीच पडले होते पायमोजे
बाळाची चाहुल लागताच विणलेले
दुपटी,कुंची-टोपडी,लंगोटी
अजुन ही गंधित होती
गाठोडयाच्या एका कोपरयात
निरागसपणे पडली होती

हे लुगडं सासुबाईंनी दिले होतं
आवडले म्हणुन जे मी म्हटलें होते
कसरीने त्याला प्रेमाने जपलेले
माझं वेडं मन हेलावून गेले

छोटे छोटे फ्रॉक ,अंगरखे
ने अजुन ही बरेच काही
आपलाच हा हट्ट काही-बाही
सुना-नातवंडाना जपलेले द्यायची
काळानुरुप सगळे बदलत गेले
जुने सर्व काही गाठोडयात गेले

आवरायचं म्हणुन पसारा काढला
नि मन त्याने चाळवले
पसारा आवरला तरी मनाला
सावरणे जमलं नाही
मग पुन्हा मी तसेच गाठोडं बांधलं
अगदी त्यात न गुंतता...









मला एकदा जगायचयं...

माणसांच्या गर्दीमध्ये हरवलेल्या या दुनियेत
मला माझं आस्तित्व शोधायचयं
माझ्या जीवनाचं ध्येय समजावुन घ्यायचयं
थोडा वेळ निवांत बसुन मला स्वत: ला आजमावयचयं
मला एकदा जगायचयं...

मी कोण,काय करतेय,काय करायचयं?
कसे करणार आहे, कधी करणार आहे?
या प्रश्नांची मला उतारे हवीतं
सगळया गर्दीला सारुन मला अलिप्त राहायचयं
मला एकदा जगायचयं...

पक्ष्यांची किलबिल, झोंबणारा वारा
बाळाचे बोबडे बोल,पहिल्या पावसाचा सुगंध
कॊजागिरीचा चंद्र,मावळता सुर्य़
रोरावणारा समुद्र,झाडांचे धुमारे
सगळं नव्याने अनुभववायचयं,साठावचयं
मला एकदा जगायचयं...

पावसाचा थेंब बनुन तहानलेल्याला शमवायचयं
वटवृक्ष बनुन दमलेल्यांना विसावायचयं
सुर्यासारखा प्रकाश,चंद्राचा थंडावा द्यायचायं
इंद्रधनुष्याच्या रंगाने सगळयांना खुलवायचयं
दुसरयांना सुखावताना मला सुखावायचयं
मला एकदा जगायचयं....


स्वत:भोवती फिरणारया या जगांत
मला माझ्या वाटेवरुन चालायचयं
तुमच्यासारख्या मित्रांची साथ मिळावयचीयं
जे जे सुंदर आहे ते इतरांना दाखवायचयं
मला असं हे जीवन जगायचयं...
मला एकदा जगायचयं


मंगळवार, १७ मार्च, २००९

घालमेल

नुकताच "धुडगुस" पिक्चर पाहिला...टाईमपास होता, पण तिच्यावर बेतलेला प्रसंग नक्कीच जीवघेणा होता..ज्यांना अश्या प्रसंगाना तोंड द्यावे लागते,त्याची अवस्था कशी होत असेल ना??देव करो नि असे दु:ख कुणाच्याही वाटयाला न येवो...


दारामागे होणारी तिची
ती घालमेल
त्याला डोळयांत साठवताना
होणारी धडपड
तिची ही अवस्था समजत असेल का त्याला?


उंबरठयावरचे माप ओलांडुन
कालच ती घरात आली
अन्‌ आज तो निघाला
दुरदेशी प्रवासासाठी
तिच्या मनातली व्यथा उमजत असेल का त्याला?


सगळयांच्या गोंधळात नीटसा
निरोप ही देता आला नाही
"परत कधी येणार?’ हा
प्रश्न कंठातच विचारलाच नाही
तिची ही अस्वस्था जाणवत असेल का त्याला?

त्याच्या ही मनात
असेल का हे सारे
वळुन तिला पाहण्याचा
मोह कसा तो आवरे
स्व:ताच्या मनाला समजावणं जमत असेल का त्याला???

बुधवार, ४ मार्च, २००९

चित्र आयुष्याचं

एका मैत्रिणीच्या कवितेवरुन सुचलेली ही कविता....

आज म्हटलं आयुष्याचं चित्र रंगवु
जमतयं का ते पाहु
वाटलं सोपं असेल
रंगीबेरंगी रंगात उठुन हि दिसेल

प्रश्न पडला रंग कुठले घ्यावे
सगळेच का फक्त आवडते घ्यावे
वाटलं आवडीचेच निवडावे

मनातले चित्र प्रत्यक्षात उतरावे

पहिला रंग घेतला मायेचा
चित्रात भास जाणवला त्या उबेचा
म्हटलं छान आहे हा रंग
आयुष्य खुलुन येईल ह्याच्या संग

नंतर घेतला तो मैत्रीचा रंग
हा हा म्हणता रंगत गेला
बरयाच जागा रंगवुन हि तो शिल्लक खुप
आयुष्याला लाभले एक वेगळचं रुप

एक एक रंग आशेचा, सुखाचा, आनंदाचा घेतला
एकमेकांत मिसळुन एक नवीनच रंग तयार झाला
तरी हि चित्रात खुप जागा होती
कश्याची तरी कमी वाटत होती

मग घेतला प्रेमाचा नाजुक रंग
मऊ-मखमली असे झाले चित्राचे अंग
या रंगाने रंगवले एक क्षणच मात्र
आयुष्याला लाभला एक अर्थ

मग घेतला एक रंग यशाचा
एक रंग किर्तीचा, न्‌ एक आस्तित्वाचा
त्याने कळला उद्देश
या आयुष्याचा,या जगण्याचा


सगळं कसं छान दिसत होतं
तरीहि मन काहीसं खिन्न होतं
मग नावडते म्हणुन पडलेले रंग उचलेले
आता तरी चित्र पुर्ण होतेय का पाहिले

एक एक घेतला दु:खाचा, निराशेचा रंग
त्यात मिसळला अपयश ,पराजयाचा रंग
उरलेत्या जागा सर्व भरुन गेल्या
चित्रातले रितेपण संपवुन गेल्या

साधं चित्र रंगवायला हि
आपण वापरतो रंगसंगती
मग आयुष्यात संकट,निराशा
अपयशाची एवढी का भिती?

दु:खाशिवाय सुखाला मजा नाही
पराजयाशिवाय यशाला कोणी विचारणार नाही
निराशा आहे म्हणुन तर आशा जिवंत आहे
आसु आहे म्हणुन तर हासु ला किंमत आहे

म्हणुन आवडीचे-नावडीचे असे काही नसते
प्रत्येकाचं एक ठरलेलं ठिकाण असते
कुठला रंग कसा वापरायचं ते आपणच ठरवायचं
नि आयुष्य एकदम रंगीत,सुंदर करायचं ...






रविवार, १ मार्च, २००९

बुट पॉलीश

मायबोलीवर विशाल कुलकर्णी यांनी ही कथा लिहिली आहे. एकदम हदयाला स्पर्शुन गेली.वाचताना वाटलं, आपण त्या मुलांच्या जागी असतो तर काय केले असते??तसं वागलो असतो का?
तुम्ही सुध्दा ही कथा वाचावी असं मला वाटतं, म्हणुन विशालजींच्या परवानगीने मी माझ्या ब्लॉग वर लिहीत आहे.धन्यवाद...
~~~~~~

बाबु, सिर्फ दो रुपीया लेगा. एकदम चकाचक पालीस करताय साब. पयले पालीस करवावो ..पसंद आया तो फीर पैसा देव, साब." मी लोकसत्तामधुन डोकं वर काढलं.

'एक तर दोन रुपयात पॉलीश आणि ते सुद्धा, तो आधी पॉलीश करणार...पसंतीस उतरलं तर पैसे द्यायचे.'
काही तरी वेगळाच अनुभव होता हा.

मला लगेच बोरीबंदरचे ते तथाकथीत अधिकृत पॉलीशवाले आठवले. त्यांच्या समोरच्या ठोकळ्यावर पाय ठेवले की फटदिशी पहिला प्रश्न येतो," छुट्टा है ना, बाद में झिगझिग नै मंगताय !" त्या पार्श्वभुमीवर हा सुखद वगैरे म्हणता येइल असाच धक्का होता.

मी पेपर बाजुला ठेवला, त्याच्या कडे नीट पाहीलं. जेमतेम १०-११ वर्षाचं वय. खपाटीला गेलेलं पोट.....

आत्तापर्यंत ट्रेनमध्ये बुटपॉलीश करणारी अनेक पोरं पाहीली होती. कधी सहानुभूती म्हणुन तर कधी स्वस्तात होतंय म्हणुन त्यांच्याकडुन बुटपॉलीश करुनही घेतलं होतं. या पोरांचं दिसणं अगदी सारखं असतं, अगदी एकाला झाका आणि दुसर्‍याला काढा असं. रापलेली कातडी, खपाटीला गेलेलं पोट, तोंडावर कमालीचे तेलकट भाव, केसाला मात्र वर्षानुवर्षे तेलाचा स्पर्ष नसतो, तसेच मेणचटलेले कपडे... खांद्यावर ती पॉलीशच्या सामानाची कळकट्ट पिशवी... शक्यतो तोंडात मावा किंवा तत्सम काहीतरी तंबाखुजन्य पदार्थ आणि चेहेर्‍यावर कमालीचे बेरकी भाव . त्याच अपेक्षेने मी त्या आवाजाच्या मालकाकडे पाहीलं..पण इथेच मला आश्चर्याचा पहीला धक्का बसला.

अंगावर साधेच, खरेतर थोडेसे फाटकेच म्हणता येतील असे पण स्वच्छ कपडे. अगदी एरीयलमध्ये नसतील धुतलेले पण स्वच्छ होते. पायात अंगठ्यापाशी शिवलेल्या, त्याला थोड्याशा मोठ्याच होणार्‍या रबरी सपाता.(स्लीपर) खांद्यावर तशीच एक हिरव्या रंगाची पण धुतलेली एकदोन ठिकाणी ठिगळे मारलेली पिशवी. हातात तो पॉलीशचा लाकडी ठोकळा आणि चेहेर्‍यावर चक्क प्रसन्न हास्य. त्याचा चेहरा पाहिल्यावर त्याला नाही म्हणायची इच्छाच होईना. खरेतर मी कधीच बाहेर पॊलीश करत नाही. तेवढीच बचत. असा कोणी मागेच लागला तर मी त्यालाच वर निर्लज्जपणे म्हणतो," फोकटमे करेंगा क्या? तो बिचारा (मनातल्या मनात का होईना) शिव्या देत निघुन जातो. पण आता याच्या निर्मळ चेहर्‍याकडे पाहुन त्याला नको म्हणावेसेच वाटेना.

मी दोन्ही पाय त्याच्यापुढे ठेवले आणि पुन्हा वर्तमानपत्रात डोके घातले. राजेश पवारने पुर्वेला गारद करताना अर्धशतकही झळकावले होते. मनातल्या मनात आपल्या निवडसमीतीला शिव्या देत ती बातमी वाचत होतो. बघाना इतके गुणी खेळाडु इथे स्थानक स्पर्धांमध्ये सडताहेत आणि नाही नाही ते वशील्याचे तट्टु राष्ट्रीय संघात निवडले जातात.

"साबजी....!" पुन्हा समोरुन हाक आली.."आता काय बाबा !"

"साब, शेवागने कितना बनाया !"

च्यायला, हा पॊलीश करतोय की पेपर वाचतोय. पण त्याचे हात सराईतपणे चालुच होते. आधी त्याने व्यवस्थीतपणे फडक्याने बुट पुसुन घेतले होते. एका ठिकाणी थोडासा चिखल साठुन वाळला होता तो त्याने जवळच्या पत्र्याच्या तुकड्याने हळुवार खरडुन काढला होता. थोडेसे पाणी लावुन ती जागा साफ करुन घेतली आणि आता त्यावर पॉलीशचा हात मारणे चालु होते.

"नही यार, ये वो वाला क्रिकेट नही है, ये तो हमारा दुलीप ट्रॉफीका मॆच है! इसमे सहवाग नही है, सारे रणजी प्लेयर्स है!"

"साबजी, रणजी बोले तो....

"अरे यार, रणजी बोले तो..इथे मात्र मी अडकलो कारण हे सगळं हिंदीत त्याला सांगणं म्हणजे आजुबाजुला बसलेल्यांना खुसखुस करायला संधी देण्यासारखं होतं. माझं हिंदी म्हणजे अगदीच धन्य आहे..उदा. "तु चल पुढे, मै तांब्या ठेवके आत्या !"

मी क्षणभर ब्लॉक झालो. त्याला माझी समस्या कळाली की काय कोण जाणे पण त्याचं पुढचं वाक्य चक्क मराठीत होतं. मग मात्र मी त्याला मराठीत सगळं समजावुन सांगीतलं. इंटरनॅशनल क्रिकेट आणि रणजी मॅचेस, दुलीप ट्रॉफी यातला फरक समजावुन सांगीतला.

"या अल्ला, बोलेतो हमारे गल्ली क्रिकेटके माफिक है तो! ऐसाबी होताय क्या साब, वो नसीम खालाका अन्वर है ना, क्या बोलींग करताय साब !! उसको लेगा क्या ये तुम्हारा रणजीवाला ?"

आता मात्र मला राहवेना. मी लोकसत्ता बाजुला ठेवला आणि त्याच्याशी बोलु लागलो.

नाम क्या है तुम्हारा, किधर रहते हो?

"पता नै साब, जबसे समज आयी है, सब्बी लोग छोटु कैके बुलाते है, नाम का तो कुच अता पता नै! वईसे तो उल्लासनगर मे रैताय अपुन. वो इस्टेशन के बाजु वाली झोपडपट्टी मे खोली नं. ११३. खोली क्या साब अपने नसीमखाला का झोपडा है, वोईच अपना ठिकाना. कबी कबी लेट हो जाताय तो इदर किदर बी सो जाताय. अब हवालदार आके उठाताय डंडा मारके पन क्या करे, साला अपनी किस्मतच लावारीस है, तो हवलदारको क्या बोलनेका ! " दुसरा पैर रखो साब ... बोलता बोलता त्याचे हात चालुच होते.’

आता मला त्याच्यात स्वारस्य वाटायला लागले होते.

"इसका मतलब पढाई - लिखाईके नामसे तो ठणठण गोपाळच होइंगा", मी पुन्हा एकदा आपलं हिंदी पाजळलं.

"नै साब, अपुन रात के इस्कुल मे जाताय ना ! वो टीचर दीदी है ना उसनेच सिखाया मेरेकु ये सब साफ सुफ रहनेका बोलके."
तो थोडासा पुढे झुकला आणि मला पुढे झुकण्याची खुण केली, आजुबाजुची माणसे बघत होती. पण आता मला त्यांची पर्वा नव्हती, मी थोडासा त्याच्याकडे खाली वाकलो..तो माझ्या कानाशी आला आणि हळुच म्हणाला ,"साहब, मेरे बोलनेपें मत जाना, मै इतनी घटीया जबान नही बोलता. लेकीन क्या करु साफसुथरी हिंदी बोलुंगा तो मुझसे पॉलीश कौन करवायेगा? पेट के लिये करना पडता है साब? लेकीन हा, गंदगी मुझसे बर्दाश्त नही होती!"

त्याक्षणी मात्र मला माझ्या हिंदीची खरंच लाज वाटली. मी मनोमन ठरवलं की याच्याशी फक्त मराठीतुन बोलायचं. ती एकच भाषा मी स्वच्छ आणि शुद्ध बोलु शकतो ना !

"किती कमाई होते रे दररोज? तुझ्या खालाला पण पैसे द्यावे लागत असतील तुला, तिच्या कडे राहतोस ना! मग या शिक्षणासाठी कुठुन पैसा आणतोस."

"अरे साब चाह है उधर राह है, हो जाता है इंतजाम. हौर रैने का बोले तो खाला येक पैसा भी नै लेतीय, उल्टा मै कबी कबी वडापाव लेके जाताय उसके लिये तो गुस्सा करती मेरेपे. अम्माको पैसेका रुबाब दिकाताय क्या करके पुछती उनो !"

आता पॉलीश करुन झाले होते. त्याने पिशवीतुन त्याचा तो जरासा रफ असणारा, ऑर्गण्डीच्या कापडासारखा फडका काढला आणि त्याने बुटावर शेवटचा हात मारायला सुरुवात केली.

"साब, अपुनने अपनी अम्मीको नै देखा, खाला बोलती मै उसको पटरीके पास मिला था ! लेकीन मेरेको लगताय की अल्लाकोच मेरे पे तरस आ गया होयेगा जो खाला की नजर पड गयी मेरेपे. अब वोईच मेरी अम्मी है हौर वोइच अब्बा ! कबी कबी कम पडता फ़ीस का पैसा तो खालाईच देतीय ना ! हौर एकाद बार उसके पास बी नै हुवा तो टीचरदीदी भर देती है! "

मला उगाचच लाजल्यासारखं झालं. खरतर त्याच्याशी किंवा त्याच्या खालाशी, टीचरदीदीशी माझा काही संबंध नव्हता कधी येण्याची शक्यताही नव्हती पण उगाचच वाटुन गेले की ही खाला काय किंवा ती टीचरदीदी काय ही माणसं कुणाच्या नजरेतही न येता आपापल्या परीने समाजाची सेवा करताहेत आणि आपण मात्र आपल्या बिझी वेळापत्रकाचा बाऊ मिरवुन नामानिराळे होतो. किती तोकडे, खुजे असतो ना आपण.

"हो गया साब, देखो कैसा चमक रहा है !" मी एकदम भानावर आलो. पाहीलं तर गाडी बोरीबंदर स्थानकात शिरत होती. मी खिशात हात घातला, पाकीट काढले ..पाहिलं तर पाकिटात पाच ची एक नोट होती, दहाच्या दोन तीन, पन्नास ची एक आणि काही शंभराच्या नोटा होत्या. मी त्यातली पन्नासची नोट काढली आणि त्याच्यासमोर धरली.

"यार छुट्टे नही है मेरे पास! एक काम करेगा वो बुक स्टॉलपे जा और उसके पास "चंपक" करके एक बच्चोकी किताब मिलती है वो लेके आ. तेरेको छुट्टे दो रुपये मिल जायेगे मेरी किताब भी आ जायेगी. त्याने एकवेळ नोटेकडे पाहीले...

क्षणभर रेंगाळला. पण लगेच त्याने ती नोट घेतली आणि म्हणाला ,"यही रुकना साब मै अब्बी आया!"

तो जोरात बुकस्टॊल कडे पळाला. आणि मी त्या जागेवरुन हाललो.तिथुन लांब जावुन व्ही.टी.च्या तिकीट बुकिंग हॉलपाशी एका खांबाआड जावुन उभा राहीलो. तो थोड्याच वेळात तसाच धावत परत आला. मला त्या जागेवर न पाहुन गोंधळला. दोघातीघांना काही तरी खुणा करुन विचारत होता. शेवटी मी सापडत नाही म्हटल्यावर त्याने ते पुस्तक आपल्या पिशवीत टाकलं, हातातल्या चिल्लरपैकी बहुदा दोन रुपये स्वत:च्या खिशात टाकले. बाकीच्या सगळ्या नोटा तिथेच बसलेल्या आंधळ्या भिकार्‍याच्या हातावर टेकवल्या. कपाळावरचा घाम पुसला...आणि..

"ए बुट पालीस....दो रुपीया...दो रुपीया.......!"

मला आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या कंजुसपणाची लाज वाटली.

विशाल

शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २००९

आठवेल का तुला?

कधीतरी मागे वळुन बघ आठवेल तुला काही
गेलेल्या क्षणांना हि पकडून ठेव सापडेल तुला काही

आठवेल का तुला आपलं पहिलं भेटणं
छोटयाश्या गोष्टीवरुन कडाक्याचं भांडणं होणं

मग काही ना काही कारणानं भेटत जाणं
कित्येक भेटीनंतर आपलं मन जुळणं

आठवेल का तुला गुलाबाचं फुल देताना सुटलेला कंप
तुझ्या हि चेहरयाचा त्यावेळी उडाला होता रंग

दुसरयाच क्षणी मात्र मनात कारंजे उडाले होते
तुझ्या हि गालावर असंख्य गुलाब फुलले होते

तु म्हणाली होतीस,फुलाची गरज नाहिये मला
हातात फक्त तुझा हात दे मला

आठवेल का तुला समुद्रात पाय पसरुन बसलेलं
लाटा चुकवुन वाळुचं घर बांधलेलं

आकाश्यातल्या चांदण्या मोजण्याची चढाओढ आठवेल का तुला
वारयांशी लावलेली पैज आठवेल का तुला

अन्‌ हातात हात घालुन उन्हांत चांदणं शोधायचो ते
रात्रीच्या अंधारात आयुष्याची स्वप्नं पाहयचो ते

आठवेल का तुला पोट धरुन हसताना डोळयांत पाणी यायचं
आणि डोळयांत पाणी आले असताना एकमेकाना हसवायचं

आठवेल का तुला आपलं ते जगणं
"मेड फॉर इच ऑदर" म्हणुन मित्रांचं चिडवणं

एवढं सगळं आठवताना मी आठवेन का तुला??
का जाणीवपुर्वक विसरुन जाशील तु मला???




माझ्या आईच्या डायरीतुन

इ-प्रसारणवर आपली आवड लागले होते."अशी ही बनवाबनवी" मधील "कुणी तरी येणार ग,पाहुणा घरी येणार ग"घे गाणे चालु येते.अन्‌ मी माझ्या हि नकळत लक्ष देऊन ऎकु लागले.

"कोणी असो तो किंवा ती, फरक तुला सांग पडतो किती?
शेवटी आई तु ,अग आई तु होणार ग, शेवटी आई तु होणार ग"

ऎकताना अंगावर रोमांच उभं राहिलं.खरंच किती सत्य आहे, आई होणे किती सुंदर आहे.पण हे जेवढं सुंदर आहे, तेवढं सहज नाही, किंबहुना सहज नाही म्हणुनच ते सुंदर आहे.मुलाला जन्म देणे,त्याला एक आकार, रुप देणॆ ,या जगाच्या लायक बनवणे हे सगळं करताना आई-वडिलांना खुप काही करावे लागते,झेलावे लागते,भोगावे लागते.आणि शेवटी पिल्लाविना घरटे पोरके होतं,ती गोष्ट वेगळीच.


आज या ब्लॉगच्या निमीत्ताने मला काही माझ्या आईबद्दल बोलायचे आहे, तिच्याबद्दल, तिच्यासाठी लिहीयचं आहे,तिच्याच डायरीतुन...
~~~~~


आज लेकीला पोचवायला मी विमानतळावर आले होते.नवरयाबरोबर ती अमेरिकेला चालली होती.दुरदेशी जाणार म्हणुन तिची उडालेली त्रेधातिरपीट,घाई,पोचवायला आलेल्यांच्या शुभेच्छा,सतत वाजणारे फोन,सामानाची आवराआवर ,चाललेली लगबग पाहुन माझ्या डोळयांत टचकन‌ पाणी आले.डोळे पुसताना मुलीने पाहिले,जवळ आली"कशाला ग रडतेस ,मम्मी?असं का करतेस? लांब थोडीच जात आहे. अग,सगळं जग आता किती जवळ आलय़ं.हवे तेव्हा फोन उचला ,न्‌ बोला.आणि आम्ही तर ३ महिन्यांसाठीच चाललोय.आता जातील बघ ३ महिने.डोळे पुस ना आता!" वॆडॆ,मी रडतेय कुठेय?माझी लेक आज गगनभरारी घेतेय नि माझ्या डोळयांत अश्रु?नाही ग,आनंदाने डोळे भरुन आले.तुमच्या सारख्या मुली माझ्या पोटी जन्मल्या म्हणुन देवांचे आभार मानतेय."

डोळे आवरले,पण मनाला कोणी आवरु शकलयं का?

माझं बालपण एका कॄष्णाकाठच्या लहानश्या गावात गेल.कृष्णामाईची कृपा नि गावकरयांचे कष्ट यांमुळे गाव खाऊन-पिऊन सुखी होते,समाधानी होते.

आमचं एकत्र कुटुंब होते.त्यामुळे घरात माणसांना तोटा नव्हता. मला ६ चुलते होते.त्यामुळे सख्खी-चुलत अशी १९-२० भावंडे होतो आम्ही.घरात बायका खुप असल्याने कधी स्वयंपाकघराची कामे आमच्या वाटणीला यायची नाहीत.नाही म्हणायला नदीवरुन पाणी आणणे, लहान भावडांना सांभाळणॆ अशीच आमची कामे. बाकीचा दिवस उनाडक्या करण्यात, दंगा घालण्यात जायचा.

मला शिक्षणाची भारी हौस.त्याकाळी मुलींना जास्त कोणी शिकवत नसे.तसेच आमचं घर हि आडवळणी,मळयात असल्याने गावात जायचं म्हणजे शेतातुन जावं लागे,त्यामुळे मुली सहसा बाहेर जात नसत.पुन्हा पाठच्या भावंडाना कोण बघणार हा हि प्रश्न होताच.

शाळेतले शिक्षक घरी येउन खुप समजावुन गेले,मुलांना शाळेत घाला म्हणुन.अन्‌ शेवटी नाईलाज म्हणुन का होईना पण आम्ही शाळेत जाऊ लागलो,आमच्या लहान भावडांना काखेत मारुन.वयात येऊपर्यत शाळेला जायची परवानगी मिळाली होती आम्हांला.

माझ्या लहान भावाला घेऊन मी शाळेत जायची कारण त्याला सांभाळायला कोणीच घरे नसे, सगळे शेतावर जात.त्याकाळी तसे चालायचे.तो कधी-कधी शाळेत शी पण करायचा पण ते सगळं मला मान्य होतं कारण मला शाळेला जायला मिळतं होतं.अजुनही मला सर्व जसेच्या तसं आठवतयं.शाळेतले गुरुजी,प्रार्थना,धडे,कविता,पुस्तके,मैत्रिणी न्‌ सर्व.शाळेत उशीरा जायला लागल्यामुळे मी तशी वर्गात मोठी होती.माझा पहिला नंबर असायचा वर्गात नेहमी.मी पत्रे खुप छान लिहायची. वरच्या वर्गातील मुली येऊन माझ्याकडुन गणिते,पत्रे लिहुन घेत.गुरुजी ही माझ्यावर खुष असत.आणि मी हि शाळेवर.

मी न्‌ माझी आतेबहिण ,आमची दोघांची जोडी होती.नदीवरुन पाणी आणताना आम्ही मोठ-मोठयांने कविता,पाढे, धडे वगैरे म्हणायचो.सगळे तोंडपाठ असायचे.मला शिकण्याची खुप इच्छा होती. मी मोठेपणी शिक्षिका व्हायचे ठरवले होते.

ठरवलेले,उरी बाळगलेले सगळेच सत्यात उतरतंच असं नाही.माझं ही तसेच झाले.पाचवीत असताना मला शाळा सोडवी लागली.गुरुजींनी घरी येऊन सांगितले,"मुलगी हुशार आहे ,पाठवा शाळेत.तिचं नुकसान करु नका".पण नाही,कोणीच बधले नाहीत.माझ्या आजीचे ठाम मत ,न्हात्या-धुत्या मुलीला मी पाठवणार नाही.

वयाच्या १७ वर्षी लग्न झालं.लग्नासाठी वडिलांकडे पैसा नाही,त्यात आम्ही ४ बहिणी.कोणाला म्हणुन खर्च करणार.माझा नवरा शिक्षक होता,म्हणुन मी मागचा-पुढचा विचार न करता तयार झाले.आशा होती,देव संधी देतोय.नक्कीच हा ’मला’ जाणेल नि मला पुढे शिकता येईल.वेडया मनाने "दोघांची सर्व्हीस,सुटसुटीत घर" असंही स्वप्न पाहिले.आणि पुन्हा एकदा माझं स्वप्न मोडलं.

लग्नानंतर मी यथावकाशाने नवरयाजवळ मनीची इच्छा व्यक्त केली.पण त्यांना लग्नानंतर शिक्षण ही गोष्ट पटली नाही.त्यात ते कोकणातले छोटे गाव.लोकं काय म्हणतील हा हि प्रश्न होताच.पण मी जिद्द सोडली नाही.त्यातच पहिल्या मुलीचा जन्म झाला.त्यादरम्यान ह्यांना हि बी.एड्‌. साठी जावे लागले.

अशीच काही वर्षं निघुन गेली.मध्ये दुसऱ्य़ा,तिसऱ्य़ा मुलींचा हि जन्म झाला.माझी लहान मुलगी १-१.५ वर्षाची झाली न्‌ मनातील ती सुप्त इच्छा पुन्हा वर आली.पुन्हा मी ह्यांच्या मागे टुमणे लावले.अन्‌ मी चक्क दहावीच्या परीक्षेला बसले.पाचवीनंतर मध्ये ५-६ वर्षाचा फरक पडल्यामुळे दहावीला बसायला मला परवानगी मिळाली.तिन्ही मुलींना सांभाळुन,लोकांच्या टोमण्याला न दाद देता मी तयारीला लागले.सायन्स प्रक्टिकल,भुमिती,गणित,संस्कृत,इंग्लिश हे सगळं नवीन होते,अवघड होतं माझ्यासाठी.ह्यांच्या मदतीने,काही दहावीच्या विद्यार्थीं मुळे सगळे पार पडले नि मी ६०% नी दहावी पास झाले.

दिशा सापडली होती,वाटचाल हि चालु होती माझी. डी.एड्‌.साठी प्रवेश घ्यायचा होता.लहान मुलांना घेऊन शिकायला मी तयार होते.पण जवळच्या ठिकाणी घ्यायचे तर डोनेशन भरावे लागते होते.आमची तेवढी तयारी नव्हती.त्यामुळे पुढच्या वर्षी पुन्हा प्रयत्न करायचे म्हणुन ठरवुन गप्प बसलो.

पण विधीलिखीत काही वेगळंच होते.त्या पुढच्या वर्षीपासुन दहावीनंतर डी.एड्‌.बंद होऊन बारावीनंतर झाले.आणि माझ्या शिक्षणाला पुर्णविराम मिळाला नि माझ्या इच्छेला सुध्दा...

ह्या सगळ्यात सांसरिक, वैयक्तिक अडचणी चालुच होत्या.सासरकडुन होणारा त्रास,मान-अपमान हे सगळं झेललं. मन दुखावले तरी त्याला सावरलं.कुणाला सांगुन ही कळणार नाहीत एवढं मनाचे हाल झालेत.एक वेळ शरीराचे हाल परवडतात पण मन दुखावले कि त्याला बरे व्हायला वेळ लागतो बराच.

त्यानंतर ही मी काही ना काही करत सतत धडपडत राहिले.शिवणकाम तर चालुच होते.पण त्याचे ही नवीन कोर्सेस,साक्षरता अभियान,पर्ल्स ग्रीन असं काही ना काही करत राहिले. काहितरी मला करायचे आहे,काही ना काही माझं असं कमवायचे आहे एवढीच इच्छा होती.

नंतर या सगळ्यांने थकुन,दमुन मी मला मुलगा पाहिजे असा हट्ट घेतला.केलेले ऒपरेशन रि-ओपन करुन मला लहान मुलीच्या पाठीवर १० वर्षांनी मुलगा झाला.

बघता बघता दिवस गेले, मुली मोठया झाल्या. लहानशा, काही सोयी नसलेल्या गावात राहुन शिकल्या.मोठी मुलगी बी.ए. झाली, मधली इंजिनीयर तर धाकटी बी.एस्सी. झाली. लग्न करुन सासरी निघुन गेल्या. आज त्याच्या डोळ्यांत मला माझं स्वप्न पुर्ण झाल्याचं दिसतयं!


आणि म्हणुन हे पाणी...आनंदाचे,समाधानाचे,कृतार्थाचे पाणी... आनंदाश्रु...!

बुधवार, २५ फेब्रुवारी, २००९

मला एकदा



मला एकदा मोगरयाचे फुल बनायचयं
गजरा होऊन तिच्या
वेणीत स्वतःला माळुन घ्यायचयं


मला एकदा झुळुक बनायचयं
गालाशी चाळा करणाऱ्या तिच्या
बटांना हळुच मागे सारायचयं

मला एकदा पाणी बनायचयं
तिच्या डोळयांच्या पापणीतुन
हळुच गालावर ओघळायचयं


मला एकदा मेघ बनायचयं
अचानक बरसुन तिला
अगदी चिंब भिजवायचयं

मला एकदा आरसा बनायचयं
तिला माझ्यात पाहताना
डोळॆ भरुन न्याहाळयचयं

मला एकदा सावली बनायचीय
आयुष्याभरासाठी तिला
साथ-सोबत करायचीयं



मीलन

वैशाख वणवा मी मी म्हणतं होता
धरित्रीच्या अंगाची काहिली वाढवतं होता
पशु-पक्षी झाडे,पाने सारेच होते त्रस्त
वरुणाराजाची करुणा भाकण्यात व्यस्त

आणि एक दिवस अचानक
वारा सगळ्यांना सांगत सुटला
सूर्य ही आडुन आडुन पाहु लागला
आसुसली धरती, न कण-कण मोहरला

ढगांच्या काळ्या रथात बसुन
विजेच्या रोषणाई, मेघांच्या वाजंत्रीसहित
आगमला वरुणराज,बरसला तो
सुखावली धरितीची गात्रं न गात्रं

पसरला सुगंध आसमंतात
ल्यायली ती एक नवा साज
सुखावले सारे , गेले विसावुनी
अंकुरले बीज तिच्या कुशीतुनी...

सोमवार, २३ फेब्रुवारी, २००९

ती समोर असली की

















ती समोर असली की
शब्द पाठमोरे होतात
सांगायचे खुप असले
तरी दिसेनासे होतात


पण आज मी ठरवले होते
तिला सर्व काही सांगायचेच
वेडया ह्या माझ्या मनाला
तिच्यासमोर मांडायचेचं


हसु नको पण मी
आरशासमोर राहुन तयारी ही केली होती
सुरुवात नि शेवट ची
पुन्हा पुन्हा उजळणी केली होती


सगळं काही आठवत असुन ही
मी गप्पच होतो
तिच्या जोरानं हालवण्याने
भानावर आलो होतो


ती माझ्याकडे बघत राहिली
न मी तिच्यात हरवलो
खोटं नाही बोलणार मी
पण पुन्हा सर्व विसरलो


ती च मग बोलली
निरव शांतता मोडत
तुझ्या मनात काय आहे
मला नाही का ते कळत???


तुझ्या मनातलं मी
कधीच वाचलं होतं
माझं मन ही नकळत
तुझं झालं होतं


मग मात्र मी
घेतला तिचा हाती हात
आयुष्याभरासाठी द्यायची
ठरवली एकमेकांना साथ


आता मात्र मला
सर्व काही आठवले
ती समोर असली तरी
आपसुकच सुचत गेले